राज्याची आता होणार भरभराट; एकनाथ शिंदेनी केला ‘हा’ निर्धार

पालघर : उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन  संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून  राज्यात  उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू असा निर्धार   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (  टीमा ) सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते

यावेळी आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, रवींद्र फाटक जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा पोलीस अधीक्षक  बाळासाहेब पाटील,तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सदस्य, तसेच आदी मान्यवर  उपस्थित होते.

उद्योग वाढीसाठी जागा, तसेच नवीन उद्योगासाठी जमीन , व शासनाच्या विविध परवानग्या  या लवकरात उपलब्ध होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ  तसेच बोईसर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालीकेमध्ये करणे याबाबतीत देखील राज्य शासन सकारात्मक निर्णय लवकरचं घेणार आहे . उद्योग वाढीसाठी  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यासमवेत तातडीने बैढक घेऊन उद्योगांचे सर्व प्रश्न युध्द पातळीवर सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना  निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.  या उद्योगांमधून  लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळतो. हे उद्योग वाढावेत  यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल उद्योजकांन कोणत्याही प्रकारचा त्रास, कोणत्याही प्रकारची  अडचण जिल्ह्यामध्ये होऊ नये अशा प्रकारच्या सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडक व पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना दिल्या

उद्योग वाढले की  रोजगार वाढणार आहेत आणि  स्थानिक नागरिकांना, बेरोजगार  स्थानिकांना  रोजगार देण्यासाठी उद्योजकांना जे-जे सहकार्य आवश्यक असेल ते सर्व सहकार्य व सुविधा उद्योगांना देण्याचे काम राज्य सरकार करेल. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.