मुख्यमंत्री आमदारांना भेटत नसल्याचा फटका विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला बसणार ?

मुंबई – विधान परिषदेच्या ( Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड (BJP’s Praveen Darekar, Ram Shinde, Shrikant Bharatiya, Uma Khapre and Prasad Lad), शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी (Shiv Sena’s Sachin Ahir and Amsha Padvi), राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (NCP’s Ramraje Naik Nimbalkar and Eknath Khadse) तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Congress Bhai Jagtap and Chandrakant Handore) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग (Cross voting) होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. काँग्रेसने अनेकवेळा मुख्यमंत्री भेटत नाहीत अशी उघडपणे तक्रार केलीये. तर, शिवसेना आमदारही खासगीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भेटत नसल्याचं बोलून दाखवतात.भाजपच्या प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे भाई जगताप यांच्यात प्रमुख लढत होत असून मुख्यमंत्र्यांवरील नाराजीचा आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला याचा फटका बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.