ठाकरेंच्या तडाखेबंद भाषणाचा फडणवीसांनी फक्त 3 शब्दात केला पंचनामा

पुणे – मुंबईत काल पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात (dasara melava) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह (PM Narendra Modi, Amit Shah) यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर राज्यातील भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीदेखील त्यांच्या धारदार शैलीत भाषणावर टिप्पणी केली. शिमग्यावर काय बोलायचं? अशी तीनच शब्दात फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतरही पत्रकारांनी त्यांना वेगवेगळ्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया विचारली, पण त्यांनी हेच म्हटलं की सूज्ञ शिमग्यावर बोलत नसतात.

मुंबई, एमएमआर रिजन आणि उर्वरीत महाराष्ट्रातून लोकं आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, हे प्रस्थापित करून दाखवलंय. म्हणून मी अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर विचारलं असता, शिमग्यावर प्रतिक्रिया नाही… असं वक्तव्य त्यांनी केलं.