महाराष्ट्र देशाचं ‘ग्रोथ इंजिन’; नववर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया; पवारांकडून नववर्षाच्या शुभेच्छा

Ajit Pawar: “महाराष्ट्र देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ असून नव्या 2024 वर्षात (New Year 2024) हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया… शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणुक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखूया… छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल कायम ठेवूया… जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंगभेदाच्या भिंती तोडून टाकूया… अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-प्रथा-परंपरा नष्ट करुया… सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचारांचा अंगिकार करुया… आपल्या सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून मजबूत, प्रगत महाराष्ट्र घडवूया..,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन 2024 वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळत्या 2023 वर्षाला निरोप देवून नव्या 2024 वर्षाचं स्वागत करत असताना सिंहावलोकन करण्याची गरज आहे. मागील वर्षात अपूर्ण राहिलेले संकल्प नव्या वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया. 2023 वर्ष राज्यासाठी आव्हानांसोबत यशाचं वर्ष होतं. शेतकरी बांधवांच्या कष्टांमुळे कृषीप्रगती, कामगारांच्या श्रमांमुळे औद्योगिक प्रगती अखंड सुरु राहिली. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश मिळवलं.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल राहिला. राज्याची सामाजिक वीण अधिक घट्ट झाली. हे सर्व संचित घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. नवीन 2024 वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातल्या इच्छा-आशा-आकांक्षा पूर्ण होवोत. सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध होवो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता; महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देणार?