Devendra Fadnavis | भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा भास्कर जाधव यांना टोला
Devendra Fadnavis – महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये भाजप आणि शिवसेना (उबाठा)नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा गोंधळ इतका वाढला की नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नीलेश राणे गुहागरमध्ये एका सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना पाटपन्हाळे कॉलेजजवळ ही घटना घडली. राणे आणि शिवसेना (यूबीटी) नेते भास्कर जाधव यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे; निश्चितपणे याची निराशाही त्यातुन पाहायला मिळत आहे. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू.
महत्वाच्या बातम्या
Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा