आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक तारेचा धक्का लागून मृत्यू

अहमदनगर – अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातल्या संगमनेर(Sangamner) तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा इथल्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक(power conductor) तारेचा धक्का लागून मृत्यू झाला होता; या मुलांवर काल संपर्कमंत्री(Liaison Minister) राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या आश्वासनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विखे पाटील यांनी गावात जाऊन नातेवाईकांचं सांत्वन केले. मृत मुलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वीज वितरण कंपनीकडून 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे योजनेतून दोन लाख रुपये दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. या प्रकरणी वीज वितरण उपअभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.