आमच्या जीवाला जर काही झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस यांची – मिटकरी

अकोला – राज्य सरकारनं सुरक्षेसंदर्भात निर्णय घेतला. त्यानुसार काही जणांची सुरक्षा वाढविण्यात आली. तर काही जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलं. त्यात आमदार अमोल मिटकरी यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. नव्या सरकारनं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.

दरम्यान, आम्हाला सुरक्षेची काही गरज वाटत नाही. सत्तेतील नेत्यांना सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमची सुरक्षा का काढली, हा आमचा सरकारला प्रश्न आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. जर आमच्या जीवाला जर काही झाल्यास याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार जबाबदार राहणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.