भिडे, एकबोटे यांच्याबद्दल पवारांना काहीच माहिती नव्हते तर मग पत्रकार परिषदेत त्यांची नावे का घेतली होती?

मुंबई – कोरेगाव भीमा येथे  झालेल्या हिंसाचाराबाबत ( Koregaon Bhima Case ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नुकतीच कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर नोंदवण्यात ( Sharad Pawar Koregaon Bhima Inquiry ) आली.  माजी मुख्य न्यायाधीश जेएन पटेल (Former Chief Justice JN Patel) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक (Former Chief Secretary of Maharashtra Sumit Malik) हे या आयोगाचे सदस्य आहेत.

यावेळी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हे पोलिसांचे अपयश आहे. सर्व यंत्रणा असतानाही त्याचा योग्य वापर न झाल्यामुळे हा हिंसाचार घडला ( How did Koregaon Bhima’s violence erupt ) असल्याची साक्ष शरद पवारांनी आयोगासमोर दिली. या प्रकरणांमध्ये असामाजिक तत्वांना वेळीच आवर घालण्यात पोलिसांना सपशेल अपयश आलं असल्याची साक्ष शरद पवार यांनी आज चौकशी आयोगासमोर दिली.

दरम्यान, मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) आणि संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविषयी वर्तमानपत्रांमध्ये वाचल्याने मला त्यांच्याविषयी माहिती आहे, मी त्यांना व्यक्तिशः ओळखत नाही, अशी साक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला दिली. दरम्यान, पवारांच्या या विधानाचा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य (Famous author Shefali Vaidya) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात, बाबरमतीकर खोटारडे म्हणजे किती खोटारडे असावेत? कोरेगांव-भीमा चौकशी आयोगापुढे साक्ष देताना म्हणतात मला कोरेगांव- भीमा प्रकरणाबद्दल जी काही माहिती आहे ती प्रसारमाध्यमांतून वाचलेली आहे, भिडे, एकबोटे यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मग १८ फेब्रुवारी २०२० मध्ये पत्रकार परिषदेत त्यांची नावे का घेतली होती?

बरं, सगळ्या मराठी पाळीव पत्रकारांपैकी एकाचीही हिंमत नाही त्यांना हा प्रश्न तोंडावर विचारण्याची? अगदी ब्रा आणि पॅंटी ह्या विषयांवर देखील ‘लक्ष ठेवून’ असणाऱ्यांची आता दातखीळ का बसते? तो सदा सर्वकाळ मौखिक जुलाब करणारा वागळे आता गप्प का बसतो? खांडेकरांच्या मिशीची टोके अश्या वेळेला खाली का वळतात? ही काही बाबरमतीच्या आधारगुटख्याची पहिलीच वेळ नाही रेटून खोटं बोलायची! असं वैद्य यांनी म्हटलं आहे.