Irregular Periods | पीरियड्स वेळेवर येत नाहीत? ‘या’ पदार्थाचे सेवन करा, लवकरच समस्या होईल दूर

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मासिक पाळी (Irregular Periods) वेळेवर न येणे ही महिलांमध्ये सामान्य समस्या बनली आहे. आजकाल, प्रत्येक दुसऱ्या स्त्रिला ही समस्या भेडसावत आहे. वेळेवर मासिक पाळी न येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होणे, थायरॉईड, पीसीओएस, मूड बदलणे, नैराश्य येणे आदी समस्या दिसून येतात.

महिलांमध्ये मासिक पाळी सामान्यतः 22 ते 28 दिवस असते. जर महिलांना यापेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नसेल (Irregular Periods) तर त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर विलंब न करता डॉक्टरांकडे जा. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला थोडी मदत करू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया-

जर तुमची मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर तुम्ही शतावरी देखील घेऊ शकता. महिलांसाठी शतावरी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याचे सेवन केल्याने तुम्ही अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया-

शतावरीचे फायदे-  शतावरीमध्ये बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात आणि त्याचा फायटोएस्ट्रोजेन प्रभाव देखील असतो. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनासाठी शतावरी खूप फायदेशीर ठरते. शतावरी पीसीओएस आणि वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी देखील वापरली जाते. स्तनपान करणाऱ्या महिलांना शतावरी पावडर मध किंवा दुधात मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

याचे सेवन केल्याने मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह सामान्य राहतो आणि पोटदुखी आणि पेटके होत नाहीत. यामुळे झोप येण्यासही मदत होते आणि थायरॉईडची समस्या दूर होते.

शतावरीचे सेवन कसे करावे- अर्धा चमचा शतावरी दिवसातून दोनदा खाणे सुरक्षित मानले जाते. अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, कोमट पाण्यात शतावरी पावडर मिसळून प्यायल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते.

ही सर्वसाधारण माहिती आहे. याचे सेवन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय शतावरी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी