श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला दोन महिने उलटूनही चोर अजूनही मोकाटच

जालना – जालना जिल्ह्यातील (Jalna District) समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात, श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला दोन महिने उलटूनही चोर अजूनही मोकाट आहेत. आता या घटनेचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या मार्फत करण्यात येणार आहे.

पोलीस महसंचालकांच्या सुचनेवरुन या एसआयटीची स्थापना करण्यात येणार असून यात जालन्यासह, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादमधील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेच्या सखोल तपासासाठी तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली जाणार आहे.एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.