चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता – जयंत पाटील

मुंबईः  नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवरून केंद्र सरकारचे कौतुक होत आहे. या चित्त्यांना जसे तिथे वातावरण होते तसे इथे देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्य जनता या प्रयत्नांचे कौतुक करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

चित्त्यांना (Cheetah) खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तोच द्यायला पाहिजे… पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी मांडलं. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावरून केंद्र सरकारवर टीका केली.