‘पेगॅसस वापरून पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर पाळत ठेवणा-या खऱ्या सुत्रधारांची नावे समोर येतील’

‘पेगॅसस वापरून पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर पाळत ठेवणा-या खऱ्या सुत्रधारांची नावे समोर येतील’

मुंबई : पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत महत्वपूर्ण असून या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे. लोकांच्या खाजगी आयुष्यात हेरगिरी करणे हा घटनेने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असून केंद्रातील भाजपा सरकारने हे काम केले आहे का नाही, याची चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी होती. ती न्यायालयाने उचलून धरली असून आता यामागचे खरे सुत्रधार जनतेसमोर आले पाहिजेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी लावलेली आहे. या चौकशीतून पेगॅसस वापरून लोकांवर पाळत ठेवणा-या आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणा-या मोदी शहांनी चालवलेला सत्तेचा गैरवापर बाहेर येईल. केंद्र सरकारने या प्रकरणातही टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षेचा बाऊ करत माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु केंद्र सरकारच्या कोणत्याच नौटंकीला न जुमानता सुप्रीम कोर्टाने तज्ञांची चौकशी समिती नेमली. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करुन केंद्र सरकारला सामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणता येणार नाही हेच न्यायालयाने बजावले आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारला जाब विचारला होता. सर्व विरोधी पक्षही राहुलजींच्या नेतृत्वाखाली या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकत्र आले होते पण हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या मोदींनी त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले मात्र न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला जुमानले नाही. न्यायालयाने चौकशी समिती नेमणे ही मोदी सरकारला मोठी चपराकच आहे.

महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह अनेक विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते. माझा फोन नंबर व अमजद खान असे नाव ठेवून थेट अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध जोडून फोन टॅप करण्यात आला होता. हा प्रश्न मी विधानसभेतही उपस्थित केला होता. तसेच राज्यातील विचारवंतांच्या लॅपटॉपमध्ये मालवेअर टाकून त्यांना तुरुंगात टाकणे, पेगॅससचा वापर करुन पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पाळत ठेवणण्याचे काम केले. न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर राज्यातील हेरगिरी प्रकरणातील सुत्रधारही बाहेर येतील, अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
‘भाजपमध्ये आल्यावर ईडी मागे लागत नाही, म्हणून शांत झोप लागते’

‘भाजपमध्ये आल्यावर ईडी मागे लागत नाही, म्हणून शांत झोप लागते’

Next Post
आर्यन खानच्या आधी हे 10 स्टार्स देखील आले होते समीर वानखेडे यांच्या रडारवर

आर्यन खानच्या आधी हे 10 स्टार्स देखील आले होते समीर वानखेडे यांच्या रडारवर

Related Posts
amruta fadanvis and Uddhav Thackeray

“वजनदार ने हल्के को…”; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसांचे नाव न घेता प्रत्युत्तर

 मुंबई –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुंबईत बीकेसीमध्ये (BKC)  घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी…
Read More
अजित पवार यांचे मराठा संघटनांच्या नेते, कार्यकर्त्यांना राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्याचे आवाहन

अजित पवार यांचे मराठा संघटनांच्या नेते, कार्यकर्त्यांना राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्याचे आवाहन

Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार,…
Read More
बाळासाहेब ठाकरेंचे नाव मतदार यादीतून नाव का वगळण्यात आले होते ? 

बाळासाहेब ठाकरेंचे नाव मतदार यादीतून नाव का वगळण्यात आले होते ? 

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे एक अधोरेखित व्यक्तिमत्त्व होते. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी…
Read More