संजय राऊत यांच्या वाचाळपणामुळे विधान परिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत ?

मुंबई – विधान परिषदेच्या ( Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड (Praveen Darekar, Ram Shinde, Srikant Bharatiya, Uma Khapre and Prasad Lad) , शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी(Sachin Ahir and Amsha Padvi) , राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे(Ramraje Naik Nimbalkar and Eknath Khadse)  तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Bhai Jagtap and Chandrakant Handore) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. काँग्रेसने अनेकवेळा मुख्यमंत्री भेटत नाहीत अशी उघडपणे तक्रार केलीये. तर, शिवसेना आमदारही खासगीत उद्धव ठाकरे भेटत नसल्याचं बोलून दाखवतात.

राज्यसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्षांवर दगाबाजीचा आरोप केला होता. त्यांनी काही आमदारांची नावे उघडपणे घेतली होती. त्यामुळे अपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीला मदत करूनही आरोप होत असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करायला हरकत नाही, असं काही अपक्ष आमदार खासगीत बोलत आहेत.यामुळेच विधान परिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत आहे  असं सांगितले जात आहे.