प्रभू श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी चौथे : नाना पटोले

नागपूर : भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर यात्रा केली. त्यानंतर ही यात्रा करणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) हे चौथे आहेत, असं सांगतानाच राहुल गांधी यांना हिंदुत्वाबाबत (Hindu) प्रमाणपत्र देणारे कोण?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे.

ते म्हणाले, राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरु झाली आहे. तेव्हापासून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत धेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकशाही विकत घेण्याचं काम भाजप करत आहे , असं सांगतानाच गोव्याबाबत मला काहीही माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.