प्रकृती बरी नसल्याचं कारण देत कालच्या सभेला दांडी मारणारे पटोले आज सुरतला गेले

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) महाविकास आघाडीची एकत्रित सभा पार पडलीअसून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. मी काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले. तुम्ही म्हणाल तेच खर ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संभाजीनगरमध्ये काल झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आले नाहीत. प्रकृती बरी नसल्याचं कारण देत पटोले संभाजीनगरला गेले नाहीत. मात्र, आज पटोले सुरतला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटायला जात आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीनगरला जायला प्रकृती बरी नव्हती. सुरतला जाताना तब्येत कशी बरी झाली? 12 तासात पटोले ठणठणीत बरे कसे झाले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तसेच पटोले आघाडीवर नाराज असल्याचंही सांगितलं जात असल्याने आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची चर्चा रंगली आहे.