‘गिरीश महाजन हे दाऊदच्या निकटवर्तीय नातेवाईकाच्या लग्नामध्ये वराती म्हणून का गेले ?’

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला समर्पित सरकार आहे असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा अपमान झाला असून त्यांच्या ह्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध करीत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हंटल आहे. तर महाराष्ट्रातील शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचं सरकार हे फक्त महाराष्ट्राच्या विकासाला आणि जनसेवेला समर्पित असल्याचे तपासे म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांचे एक मंत्री गिरीश महाजन हे दाऊदच्या निकटवर्तीय नातेवाईकाच्या लग्नामध्ये वराती म्हणून का गेले याचा अद्याप उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं नाही. या घटनेची चौकशी तत्कालीन नाशिकचे पोलिस आयुक्त वींद्र सिंगल यांनी केली. त्या चौकशीचा अहवाल देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कधीच जनतेसमोर मांडला नाही व त्या अहवालावर कुठलीच कार्यवाही केली नाही. असा गंभीर आरोप देखील तपासे यांनी केला आहे.

गिरीश महाजन फडणवीस सरकारचे मंत्री हे दाऊदचा निकटवर्तीय च्या लग्नाला जातात हे फडणवीसांना चालतं असंच म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळामध्ये गिरीश महाजन यांचा राजीनामा तात्काळ का घेतला नाही हा स्वाभाविक प्रश्न आज महाराष्ट्राची जनता त्यांना विचारत असल्याचा घणाघात महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.