खोके सरकारला कदाचीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटत असावी – सुप्रिया सुळे

पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने आणि सर्व कारभार प्रशासनाच्या हाती असल्याने जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ राजकीय पक्षच नव्हे तर सामाजिक संस्था देखील निवडणुका घेण्याची मागणी करत आहे मात्र निवडणूक आयोग आणि सरकार काही याबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.

यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी जनतेला वेठीस धरणे बरोबर नाही. सध्या महापालिका निवडणुकांचा कार्यकाळ संपल्याने महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकांची कामं खोळंबली आहेत.असं त्यांनी म्हटले आहे.

नागरसेवक हा स्थानिक प्रतिनिधी असतो, तो लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम करतो, मात्र निवडणुका लांबल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. प्रसार माध्यमांनी निवडणुकीबाबत सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. हा सर्व्हे खोके सरकारच्या विरोधात जाणारा असल्यामुळेच कदाचीत निवडणुका घेण्याची त्यांना भीती वाटत असावी असा टोला सुप्रीया सुळेंनी लगावला आहे.