तुझी जी फाटली होती बेळगावला जाण्यासाठी त्याचं काय; निलेश राणेंचे संजय राऊत यांना सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असून नुकताच कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यावर भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी खरपूस टीका केली आहे.

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच शिंदे सरकारवर टीका करताना महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

यावरून राऊत यांचे जुनेपुराण उकरून काढत निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 15 दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आलं होतं. परंतु न्यायालयाचं कवच असतानाही राऊत कर्नाटकात गेले नाहीत. यावरून सडेतोड प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले, ‘काय संजय राऊत परत भुंकायला सुरू केलं रोज सकाळी. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर विषयामध्ये जे व्हायचं ते होईल पण तुझी जी फाटली होती बेळगावला जाण्यासाठी त्याचं काय. तू कधी जाणार ते सांग?’ असा सवालही निलेश राणे यांनी केला आहे.