Maharashtra Gram Panchayat Election:  मनसेची पालघरमध्ये बाजी 

मुंबई  : राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळाली आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी झाली असून गावचा सरपंच कोण हे ठरलं आहे.(Maharashtra Gram Panchayat Election).

पालघर तालुक्यातील सर्वात मोठी मतदार संख्या असलेल्या सातपटीमध्ये राजकारणाची उलथापालथ पाहायला मिळत आहे. सातपाटीमध्ये मनसेच्या सीमा भोईर सरपंच पदी विजयी झाल्या तर 17 पैकी 11 सदस्य विजयी झाले. गुंडले ग्रामपंचायतीवर देखील मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली आहे.