विरोधीपक्षाची झाली पंचाईत; भारताचे नाव बदलण्याचा ‘या’ नेत्याने आणला होता प्रस्ताव

Renaming India to Bharat : संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. प्रेसिडंट ऑफ भारत केल्यानंतर आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज बुधवारी निघणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या विरोधक याला सातत्याने विरोध करताना दिसत आहेत, मात्र देशाचे नाव बदलण्याची मागणी ही होण्याची काही पहिलीच वेळ नाही. याआधीही एकदा असाच प्रयत्न झाला आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेत इंडिया हे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत इंडिया हे नाव बदलून भारत करण्याचा ठराव आणला आणि तो एकमताने मंजूर करून घेतला होता.

समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यावर म्हणतात की मुलायम सिंह हे नेहमीच एक देश, एक नावाच्या बाजूने राहिले आहेत. दरम्यान, आता मुलायम सिंह यादव यांनीच हि मागणी केल्याची माहिती समोर आल्याने विरोधकांची मोठी पंचाईत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole