ब्रिजभूषण शरण सिंह पाठोपाठ आता परमहंस दास यांनीही दिली राज ठाकरेंना धमकी 

अयोध्या –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) ५ जूनला अयोध्येला जाणार असले तरी त्यांचा दौरा वादात सापडला आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांच्या इशाऱ्यानंतर आता संत परमहंस दास (Saint Paramahansa Das) यांनीही राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असं म्हटलं आहे.

राज ठाकरे उत्तर भारतीयांची (North Indians) माफी न मागता अयोध्येत (Ayodhya) आले तर त्यांना छठी का दूधची आठवण करून देतील, असे ते म्हणाले. संत परमहंस म्हणाले की, राज ठाकरे माफी मागून आले तर हरकत नाही. त्यांना आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे.असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपली भूमिका आणखी कठोर केली आणि ते म्हणाले, “हे माझे वैयक्तिक आंदोलन आहे, पक्षाचे नाही. मी आधी प्रभू रामाचा वंशज आहे, नंतर उत्तर भारतीय आणि नंतर भाजपचा खासदार आहे.  राज ठाकरे यांना माफी मागावीच लागेल असं देखील ते म्हणाले