राखी सावंतच्या अडचणी वाढणार! जिवलग मैत्रिणीनेच दाखल केली पोलिसात तक्रार, कारण काय

रिअॅलिटी शो क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आदिल खान दुर्रानीसोबतचे (Adil Khan Durrani) तिचे लग्न पुन्हा चर्चेत आले आहे. आदिल खानची ६ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याने राखी सावंतवर आरोप केले आहेत. या आरोपांदरम्यान राखी सावंतची जिवलग मैत्रीण राजश्रीही तिच्या विरोधात उभी राहिली असून तिने राखीवर मोठी कारवाई केली आहे.

राखी सावंतची बेस्ट फ्रेंड राजश्री हिने तिच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पापाराझी विरल भयानी यांनी राखीशी संवाद साधला आहे. यावर बोलताना राखी म्हणाली, ‘राजश्री मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन. हे ऐकून मला धक्काच बसला. माझ्या वाईट काळात ती माझ्या पाठीशी उभी राहिली. तिच्या वाईट काळातही मी तिच्या पाठीशी उभी राहिले. ती नेहमीच माझी मैत्रीण असेल. मला आश्चर्य वाटते माझ्या आयुष्यात काय चुकतंय ते कळत नाही.’

याबाबत बोलताना राजश्रीने दावा केला की, तुरुंगातून सुटका होताच राखीने तिचा पती आदिल दुरानीला धमकी दिली. तसेच, राजश्रीने सांगितले की, तिला अजून खूप काही सांगायचे आहे, जे ती मीडियासोबत शेअर करणार आहे. सध्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन तिने एफआयआर दाखल केल्याचे राजश्रीचे म्हणणे आहे.