“शिंदे- फडणवीस तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानानुसार राज्य चालवत असाल तर संभाजी भिडेला अटक करा

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सचिन खरात यांची मागणी

महाराष्ट्र राज्यामध्ये सतत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. आता परत एकदा बोलताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य विषयी, झेंडा आणि राष्ट्रगीत विषयी अत्यंत चुकीचे उद्गार काढले आहेत. भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि तिरंगा झेंडा आणि आपले राष्ट्रगीत स्वाभिमान आहे.

त्यामुळे संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्य विषयी, तिरंगा विषयी आणि राष्ट्रगीता विषयी चुकीचे विधान करून देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोचवली आहे, हा देशद्रोह आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब (Devendra Fadnavis) तुम्ही खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार राज्य चालवत असाल तर संभाजी भिडेला तात्काळ अटक करा.