भाजपच्या तोंडाला सुटले पाणी; ठाणे, कल्याण, पालघर लोकसभा मतदारसंघावर ठोकला दावा 

मुंबई – आधी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपने आता थेट ठाणे आणि पालघरवरही दावा सांगितला आहे.  भाजपचा काल ठाण्यात मेळावा होता. यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर (BJP MLA Sanjay Kelkar) यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या दरम्यान, त्यांनी पालघरवर देखील दावा ठोकला. विशेष म्हणजे संजय केळकर यांनी गिरीश महाजन यांच्यासमोरच या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

2014मध्ये मोदींमुळे निवडून आलेले लोक आता ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा करत आहेत. हे सर्वजणमोदी ट्रेनमध्ये बसूनच लोकसभेत निवडून गेले.आपल्या पक्षातील असो की दुसऱ्या पक्षातील, सर्वजण मोदी लाटेत निवडून आले. आता अनेक प्रकारचे दावे करत आहेत. मला आश्चर्य वाटतं. किवही वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून जाऊ शकणार नाही. ठाणे, कल्याण, पालघर हा जिल्हा भाजपाचाच होता. कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच आहे,अस ते म्हणाले आहेत. Tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.