गुहावटीवरून आल्यावर शिंदे आणि मिंधे गटाच सरकार पडणार; शरद कोळी यांचा दावा

Solapur – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार पुन्हा गुवाहाटी (Shinde Group Guwahati Tour 2022) दौऱ्यावर गेले आहेत. महाराष्ट्राचं सत्तानाट्य (Maharashtra Politcal Crisis) जिथून सुरू झालं, त्याच भूमीत परत जाऊन शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेतील.

सत्तासंघर्षावेळी शिंदे गट आमदार जिथे थांबले होते त्याच रॅडिसन ब्लूमध्ये शिंदे गटाचा मुक्काम असेल. त्यासाठी हॉटेलच्या 100 खोल्या बुक केल्याचं समजतंय. शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यासाठी कामाख्या मंदिरातली सुरक्षा वाढवण्यात आलीय. शिंदे गुवाहाटीला निघणार म्हटल्यावर जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू झालीय.

या सर्व घडामोडींवर ठाकरेगट लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी याच मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे. हिंदुत्वचा मुद्दा समोर करून राज्यात सत्ता परिवर्तन करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि मिंधे गटाची सरकार आणली.पण या सरकारने हिंदुत्व खुंटीला अडकवला आहे.या राज्यासाठी आराध्य दैवत शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले,त्या शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल वादग्रस्त विधान करतायत ,त्या राज्यपालांची पाठराखण हे राज्य सरकार करत आहे.गुहावटीला जाताय तर याद राखा,गुहावटीवरून आल्यावर तुमचं सरकार पडणार असल्याचा दावा शरद कोळी यांनी केला आहे.