‘शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर जाणार’

मुंबई – राज्यात सध्या भोंगे आणि त्याबरोबर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) जोरात चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना अमरावतीचे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

आज खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी पत्रकार परिषद घेत आपले मुद्दे मांडले. 100 धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही आहोत, बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. हनुमान जंयती ( Hanuman Janyati ) दिवशी मुख्यमंत्री यांनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली नाही, त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. आम्हाला नाव स्मरण करण्यासाठी, हनुमान चालीसा पठण करण्यास कोणीही रोकू शकत नाही. असे राणा दाम्पत्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले.