‘…आणि परत म्हणायचं आम्हाला तिकीट दिल नाही’, शिवसेना खासदाराची संभाजीराजेंवर टीका

पुणे – संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभजीराजे ( Chatrapati Sambhajiraje ) यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यातच आज त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.

संभाजीराजे छत्रपती (sambhajiRaje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत (Sambhaji Raje Press Conference) ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मागील १५ ते २० वर्षांपासून मी घर सोडून काम करतोय. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कुणी मला राज्यसभेत पाठवलं, हे न पाहता समाजाची भूमिका प्रांजळपणाने मांडली. हे सगळं लक्षात घेऊन मी सर्वांना राज्यसभेत पाठवण्याचं आवाहन केलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मी मुंबईत आलो. मी जे बोलणार आहे, ते बोलण्याची इच्छा नाही. माझ्या तत्वात, स्वभावात, हे नाही. पण मला ते बोलायचं आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो वा पुतळा. आपण दोघांनी तिथं जाऊ. शिवाजी महाराजांचं स्मरण करायचं आणि जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल, तर तुम्ही आधी सांगा, असं आव्हान संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच  मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान,   संभाजीराजेंच्या या आरोपानंतर शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव ( Sanjay Jadhav Replied To Sambhaji Raje ) यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे.  शिवसेनेचा उमेदवार कोण असावा, हे शिवसेना ठरवेल. राजे हे काही शिवसेनेत नाही. त्यांनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावी ते ही अपक्ष? त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडे मागावी. तुम्ही 6 वर्ष भाजपचे खासदार होते. आत्ता शिवसेनेने तुम्हाला तिकीट का द्यावं? तरीही शिवसेनेने तुम्हाला प्रस्ताव दिला होता की शिवबंधन बांधा. पण तुम्ही तस केलं नाही. एकतर पक्षाचा स्वीकार करायचा नाही आणि परत म्हणायचा आम्हाला दिल नाही. याला अर्थ नाही, अशी टीका जाधव यांनी केली.