निवडणुका घ्या, मग शिवसेना कोणाची आहे याचा निकाल लागेल; संजय राऊत यांची डरकाळी 

Shivsena :  शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The Central Election Commission has decided to give the name Shiv Sena and the symbol Dhanushyaban to the Shinde group.) उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.

या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले,  देशात लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार चालला आहे. सुडाच राजकारण सुरु आहे. निवडणुका घ्या, मग शिवसेना कोणाची आहे याचा निकाल लागेल असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाचा गळा दाबून निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, जिथे ठाकरे तिथे शिवसेना असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

जे कंपनावर बसले होते, ज्यांना उड्या मारायच्या होत्या, त्यांनी उड्या मारल्या आहेत. उड्या मारणारे म्हणजे शिवसेना नाही. 40 आमदार आणि 10-12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. जमिनीवर जी शिवसेना आहे, ती खरी शिवसेना आहे. त्या शिवसेनेमुळे हे आमदार आणि खासदार झाल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. काल कामकाज सुरू होताच न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून येत्या मंगळवारी, 21 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.