घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात होणार असून या लढाईत घटनेचा विजय होईल – महेश तपासे

मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडी आता घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात होणार असून या लढाईत घटनेचा विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू असून यासाठी आता सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ बुधवारपासून सुनावणी घेणार आहे.

घटनापीठासमोर जे काही दावे प्रतिदावे या राजकीय घडामोडीवर होतील त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे त्यामुळे सर्वात शेवटी भारतीय राज्यघटनेचाच विजय होईल असा आमचा विश्वास आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.