जरांगेंचं मुंबईतील आंदोलन रोखण्यासाठी मीरा रोड प्रकरण घडवण्यात आले; इम्तियाज जलील यांचा दावा

Mumbai Mira Road: संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने उत्सवाचं वातावरण असतानाच, मुंबईतील मीरा रोडच्या (Mira Road Tension) नया नगर (Naya Nagar) परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे सध्या आरोप-प्रत्यारोप होत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एक अजब दावा केला आहे.

मीरा रोडवरील घडलेली घटना जाणीवपूर्वक घडवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून करण्यात येत असलेल्या शांतेतील आंदोलन रोखण्यासाठी आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत (Mumbai) येऊ नयेत यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की,“ मीरा रोडची घटना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. लाखो मराठ्यांनी मुंबई गाठू नयेत अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, अशावेळी मुस्लिमांना शस्त्र म्हणून वापरण्याची त्यांची जुनी रणनीती आता पुन्हा वापरली जात आहे.

या घटनेत दंगलखोरांवर कोणतेही कारवाई न करता, पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते. मीरा रोड हा संवेदनशील परिसर असून, तेथे अपेक्षित व्यवस्था का करण्यात आली नाही. सी ग्रेडच्या नेत्यांना द्वेषपूर्ण वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याची परवानगी का दिली जात आहे?, हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नयेत आणि प्रामाणिकपणे आपले काम करावे. तर, महाराष्ट्र शांत राहावा अशी आमची इच्छा असल्याचे जलील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या