कॉंग्रेसच्या प्रत्येक चुकीचा वापर मोदी करुन घेतात – निखील वागळे

Bharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘भारतरत्न’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली आहे. ठाकूर एक प्रमुख समाजवादी नेते होते. त्यांना जननायक म्हणूनही ओळखलं जात असे. मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी भरीव कार्य केलं होतं.

दरम्यान, या घोषणेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया देताना त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले. कॉंग्रेसच्या प्रत्येक चुकीचा वापर मोदी करुन घेतात. नेहरु किंवा इंदिरा गांधींच्या काळातच बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला हवं. कर्पुरी, लोहिया, ज्योती बसू या विरोधी नेत्यांनाही. पण कॅांग्रेसने तो मनाचा मोठेपणा कधीच दाखवला नाही. असं वागळे (Nikhil Wagle) यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या