महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता, सगळा मनमानी कारभार सुरू होता – चव्हाण

Ashok Chavan: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा (Ashok Chavan Resignation) दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हे तर महाविकास आघाडीलादेखील (Mahavikas Aghadi) धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळेपक्षाची गळती थांबविण्याचे मोठे आव्हान आता कॉंग्रेस समोर असणार आहे.

दरम्यान, पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता. सगळा मनमानी कारभार सुरू होता, असं अशोक चव्हाण म्हणाले. निवडणुकांच्या अनुषंगानेही अशोक चव्हाण यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये तयारी नव्हती. काँग्रेसमध्ये कोणतेही बदल दिसत नव्हते. कितीकाळ स्वत:ची कोंडी होऊ द्यायची, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया