Ashish Shelar | काँग्रेस पासूनच संविधानाला धोका; आशिष शेलार यांचा दावा 

Ashish Shelar | काँग्रेसच्या राजवटीतच गेल्या साठ वर्षात देशाच्या संविधानामध्ये अनेक वेळा बदल केले गेले, छेडछाड केली गेली. उलटपक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात कधीही संविधानात बदल झाला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानाला धोका हा काँग्रेस पासूनच आहे, अशा शब्दात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काँग्रेसवर आज हल्लाबोल केला.

मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये महायुतीचे मिळावे आयोजित करण्यात येत असून काल गोरेगाव, वर्सोवा, वडाळा या विधानसभेचे मेळावे पार पडले, तर आज विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आमदार अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला स्थानिक आमदार पराग अळवणी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच झूठपत्र आहे, ते न्याय पत्र नाही, अशी टीका करीत काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणांचा शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच पार्ले विधानसभेतील मतदारांचे प्रश्न मग तो फनेल झोन मधील  रहिवासी इमारती असो एअरपोर्ट अथॉरिटीच्या हद्दीतील झोपडपट्टी असोत, भाडेकरूचा असो या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार पराग अळवणी आणि विद्यमान खासदार पूनम ताई महाजन यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पार्ले विधानसभेतून महायुतीच्या उमेदवाराला जे मताधिक्य मिळेल ते आघाडीच्या उमेदवाराला तोडताच येणार नाही, असा विश्वास व्यक्त करत आमदार आशिष शेलार यांनी या मेळाव्याला संबोधित केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत