उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा मोदींनी धसका घेतलाय – संजय राऊत 

Sanjay Raut – वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा मोदींनी धसका घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वारंवार महाराष्ट्रात येत आहेतअसा अजब दावा त्यांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना जिथे राजकीय फायदा दिसतो तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मतं मिळवून देऊ शकत नाहीत म्हणूनच मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत.राऊत यांच्या या टीकेला आता भाजप कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिर होतंय याचा आनंद; मांस विक्री करणार नाही; कुरेशी समाजाचा निर्णय

Facebook Scam: महिलेला गरोदर करण्याचे 10 लाख रुपये मिळतील… या गर्भधारणेच्या घोटाळ्याला बळी पडू नका!

दोन भावांनी राम मंदिरासाठी बनवला सोन्या-चांदीचा झाडू, लवकरच अयोध्येला पाठवणार