‘या मुलाला कोणी मारलं? नेत्यांनी, अभिनेत्रींनी की दहीहंडी दाखवणाऱ्या चॅनलवाल्यांनी?’ 

मुंबई : राज्यात दोन दिवसांपूर्वी दहिहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र आता एक दुखद बातमी समोर येत आहे. दहिहंडीमध्ये जखमी झालेल्या मुंबईतील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. संदेश दळवी, असं मृत्यू झालेल्या गोविंदाचं नावं आहे.

संदेशच्या डोक्याला इजा झाली होती. रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात अँडमिट केल होतं. डोक्याची शस्रक्रिया झाली होती, पण गंभीर दुखापत झाल्यानं संदेश दळवीची झुंज अपयशी ठरली. संदेश दळवीचा रुग्णालयातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, या मुलाला कोणी मारलं? दहीहंडीला प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यांनी की तिकडे स्टेजवर नाचणाऱ्या अभिनेत्रींनी की मतांसाठी लाचार संयोजकांनी की हजारोंच्या संख्येनं जमलेल्या बघ्यांनी की जणूकाही देशाला नवं स्वातंत्र्य मिळालंय अशा थाटात दिवसभर दहीहंडी दाखवणाऱ्या चॅनलवाल्यांनी? की आमचे सण जोरात साजरे झाले पाहिजेत म्हणणाऱ्यानी ? असे सवाल चौधरी यांनी उपस्थित केले आहेत.