IND vs PAK: भारत आणि पाकिस्तामध्ये पहिला क्रिकेट सामना कधी खेळला गेला? जाणून कोण जिंकले आणि कोण हरले  

World Cup 2023 IND vs PAK: विश्वचषक 2023 चा 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे . टीम इंडिया आणि पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता हा सामना रंजक असेल. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये पहिला सामना 1952 मध्ये झाला होता. हा कसोटी सामना होता. पहिला एकदिवसीय सामना 1978 मध्ये क्वेटा येथे खेळला गेला होता. भारताने पहिली कसोटी आणि वनडे दोन्ही जिंकले.

लाला अमरनाथ (Lala Amarnath) यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी खेळली. दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 372 धावा केल्या होत्या. यादरम्यान विजय हजारेने 76 धावा केल्या होत्या. विजय मांजरेकरने 23 धावांचे योगदान दिले होते. हेमू अधिकारीने नाबाद 81 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 150 आणि दुसऱ्या डावात 152 धावा करत सर्वबाद झाला. अब्दुल कारदार यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने हा सामना खेळला.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीनंतर भारताने पहिला एकदिवसीय सामनाही जिंकला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना क्वेटा येथे १९७८ मध्ये खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 गडी गमावून 170 धावा केल्या. यादरम्यान मोहिंदर अमरनाथने 51 धावांची शानदार खेळी केली. दिलीप वेंगसरकरने 34 धावा केल्या. सुरिंदर अमरनाथने 37 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 166 धावा करू शकला. पाकिस्तानकडून माजिद खानने सर्वाधिक 50 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन