सोमय्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आता भाजप त्यांचाच पाठींबा घेणार ?

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduhriday Samrat Balasaheb Thakre) यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप (Political earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, जे नेते सध्या शिंदे यांच्या सोबत आहेत त्यातील काही नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik). शिवसेनेच्या या नेत्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. बंडाचा झेंडा हातात घेतल्यावर भाजपशासित राज्यात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातंय. उद्या सरकार बनवण्याची वेळ आली तर त्यांचा पाठिंबा भाजपला चालणार का? असा सवाल सध्या सोशल मिडीयावर उपस्थित केला जात आहे.