भाजपला प. महाराष्ट्रात मोठा धक्का; मातब्बर नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असताना आता राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. शिराळा तालुक्यातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (shivajirao Naik) हे आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(NCP)  प्रवेश करीत आहेत.

भाजपच्या(BJP) नेत्यांनी अडचणीतील संस्थांना अपेक्षित मदत तर केलीच नाही, या उलट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)यांनी पक्षांतर्गत मतभेद थोपविण्याऐवजी खतपाणी घातल्याने आपण भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेतृत्वाने आमच्या संस्थांना कोणतीच मदत केली नाही. पक्षाच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत गटबाजी रोखता तर आलीच नाही, उलट पाठबळ दिले गेले. यामुळे कार्यकर्ते दिशाहीन बनण्याचा धोका होता. यामुळे सर्वाना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असं त्यांनी सांगितले.