‘समस्त हिंदू समाज या बांडगुळांना आणि शकूनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही’

पुणे – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर केलेला जातीयवादाचा आरोप किती अचूक आहे याचा नुकताच प्रत्यय सांगलीच्या सभेत आला आहे. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची चांगलीच नौटंकी पाहायला मिळाली. नौटंकी तर ते नेहमीच करतात मात्र यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांनी हिंदू परंपरांची आणि पुरोहित वर्गाची  खिल्ली उडवली आहे.

विशेष म्हणजे एका समाजाची खिल्ली उडवली जात असताना  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री  जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) स्टेजवर उपस्थित होते. पुरोहित वर्ग विविध कार्यांमध्ये मंत्र उच्चारण करतो त्याची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली.  हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारूनसुद्धा त्यांनी खिल्ली उडवली, त्यावेळी  जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही. पाटील- मुंडे या जेष्ठ नेत्यांनी त्यांना अजिबात रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ते सुद्धा हसत हसत त्यांना दाद देताना दिसून आले.

यामुळे राज्यभरात पुरोहित संघटना संतप्त झाल्या असून आमदार अमोल मिटकरींवर टीका करत आहेत.असा कोणताही मंत्र कन्यादान सोहळ्यात वापरला जात नाही असं सांगण्यात येत आहे. पुढे मिटकरी यांनी हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या कन्यादान (kanyadan)  या शब्दाची आणि विधीची देखील खिल्ली उडवली त्यावेळी सुद्धा मुंडे आणि पाटील हसत होते असं दिसतंय.  एखाद्या विशिष्ट व्यवसायाविषयी, एखाद्या विशिष्ट समाजाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या महाराष्ट्रव्यापी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या पद्धतीने वर्तणूक करावी याविषयी सोशल मीडियातून प्रचंड नाराजी देखील व्यक्त होत आहे.

दरम्यान,  भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ते म्हणाले, नुकताच एक व्हिडीओ वायरल झाला असून त्यात पवित्र हिंदू धर्माची, परंपरेची, संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली आहे. हिंदु धर्माची चेष्टा करणारे हे दुसरा तिसरा कोणी नसून राज्याच्या राजकारणातल्या शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी आहे तर त्यावर निर्लज्जपणे दात काढणारे धर्म बुडवे मंत्री जयंत पाटील आणि 3-4 बायका सोडणारे मंत्री धनंजय मुंडे होते. हिंदूंची खिल्ली उडवणारे हे बांडगुळ पावसाळ्या आधीच उगवायला लागलेत. तेव्हा समस्त हिंदूं समाज या बांडगुळांना आणि शकूनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले.