आलिया भट्टने लग्नानंतरचे शेअर केले फोटोज; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई – बॉलीवूड कलाकार आलिया भट्ट ( Alia Bhatt ) आणि रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) यांनी गुरुवारी मुंबईत रणबीर च्या ‘वास्तू’ या निवासस्थानी विवाहबद्ध झाले. या सोहळ्यात त्यांच्यासोबत जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सामील झाले होते. काल त्यांचे लग्नाआधीचे कार्यक्रम म्हणजेच हळद आणि मेहेंदी सुद्धा रणबीर च्या निवासस्थानी साजरे केले. आलिया भट्ट आज Mrs.रणबीर कपूर झाली आहे. बॉलीवूड चा हा favorite कपल लग्नाच्या पोशाख मध्ये पाहण्यासाठी सगळेच फॅन्स व युझर्स आतुरतेने वाट पाहत होते.

आलियाचा लेहेंगा आणि रणबीर ची शेरवानी सभ्यासाची ने डिझाईन केला होता तर आलियाचे मेकअप बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट पुनीत बी सैनीने केले होते. गुरुवारी दुपारी लग्न संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी आलिया ने आपल्या इंस्टाग्राम हॅन्डल वर लग्नाचे पहिले फोटोस आपल्या फॅन्स आणि युझर्स सोबत शेयर केले. रणबीर आणि आलिया लग्नाच्या पोशाख मध्ये खूपच सुंदर दिसत होते.सोबतच आलिया ने पोस्ट मध्ये लिहले आहे ज्या बाल्कनीत आम्ही आमच्या रेलशनशिप चे ५ वर्ष व्यतीत केले, तिथेच लग्न केलं.

आमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या साक्षीने आज आम्ही आमच्या आवडत्या जागी, ज्याठिकाणी आम्ही आमच्या रिलेशनशिपची पाच वर्षे व्यतीत केली, त्या बाल्कनीमध्ये लग्नगाठ बांधली. अनेक आठवणी एकमेकांसोबत विणण्यासाठी आम्ही दोघं उत्सुक आहोत. आठवणी ज्या प्रेमाने, हास्याने, आनंदाने, मूव्ही नाईट्सने, छोट्यामोठ्या भांडणांनी, वाईन्सने आणि शांततेने परिपूर्ण असतील. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम- रणबीर आणि आलिया’, अशा शब्दांत आलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.