राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी; महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ‘या’ मातब्बर नेत्याचा घरचा आहेर

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.लोकसभा सचिवालयानं (Lok Sabha Secretariat)  काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गांधी यांना सुरत न्यायालयानं (Surat Courts) दोषी ठरवल्यापासून म्हणजे 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार, कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला आणि किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेला खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल अशी तरतूद आहे.

दरम्यान, कॉंग्रेसकडून या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला जात असताना दुसऱ्या बाजूला एका काँग्रेस नेत्याने त्यांना घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे. एका माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी चार वर्षांपूर्वी काही चुकीचं विधान गेलं होतं. त्यातून ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील ओबीसींची माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे.