‘मला वाटलं भाऊ गेला..’, रिषभ पंतच्या अपघातानंतर एक वर्षानी मित्राचा खुलासा
Axar Patel Reaction on Rishabh Pant Accident: भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतचा अपघात जवळपास एक वर्षापूर्वी 30 डिसेंबर 2022 रोजी झाला होता. संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का देणारा हा क्षण होता. आपला आवडता क्रिकेटपटू ऋषभ पंत जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे यावर क्रिकेट चाहत्यांना विश्वास बसत नव्हता. आता ऋषभ पंत पूर्णपणे बरा झाला असून संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने पंतच्या अपघाताची बातमी मिळाल्याचा क्षण कथन केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने व्हिडिओ शेअर केला आहे
ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे दोघेही स्टार खेळाडू आणि चांगले मित्रही आहेत. नुकतेच दोन्ही खेळाडू आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. खेळाडूने त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. आता ऋषभ पंत बरा झाला आहे, दिल्ली कॅपिटल्सने 30 डिसेंबर 2023 रोजी त्याच्या ट्विटर हँडलवर 5 मिनिट आणि 14 सेकंदाचा व्हिडिओ जारी केला आहे, म्हणजे अगदी एक वर्षानंतर. या व्हिडिओमध्ये अक्षर पटेलने ऋषभ पंतला अपघात झाल्याची बातमी मिळाल्यावर त्याने कशी प्रतिक्रिया दिली हे सांगितले.
365 Days since that fateful night.
Every day since then has been nothing but full of gratitude, belief, self-care, hardwork and a never-give-up approach towards making a roaring comeback in the game that runs thick through his veins 🫰🏻
Here’s to seeing the unorthodox,… pic.twitter.com/y5TD35RCrS
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 30, 2023
पंतच्या अपघातावर अक्षरची काय प्रतिक्रिया होती?
अक्षर पटेल म्हणाला की, जेव्हा मला कळले की ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा मला वाटले की हा भाऊ गेला आहे. प्रत्येकजण मला पंतबद्दल विचारू लागला, कारण सगळ्यांना वाटले की पंत माझ्याशी शेवटचे बोलला असावा. अक्षर म्हणाला की, पंतच्या अपघाताच्या एक दिवस आधी मी पंतशी बोलणार होतो, पण बोलू शकलो नाही. दुसऱ्याच रात्री पंतचा अपघात झाला. आता पंत बरा झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला वर्षभरानंतर खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’
आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’