Eknath Shinde | अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला मदत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Eknath Shinde | अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला मदत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Eknath Shinde | विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. याबाबत निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर करून निवडणूक आयोगाला विनंती करून याबाबत अधिकारी स्तरावर बैठक घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज हिंगोली जिल्ह्यातील हादगाव येथे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी या भागात झालेल्या अवकाळी पावसाची आपल्याला पूर्ण जाणीव असून स्थानिक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी झालेल्या नुकसानाची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने सुरू करून त्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा आणि खान्देशच्या भागात सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडडाटासह गारपीट आणि आवकाळी पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला असून लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, टरबूज आणि केळी यांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी, गहू या पिकांना देखील त्याचा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आलेल्या या अस्मानी संकटाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकारची मोठी अडचण झालेली आहे.

असे असले तरीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आचारसंहितेचा अडसर दूर सारून अधिकारी स्तरावर बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत देता येईल का याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करून या अडचणीतून मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव इकबालसिंह चहल यांना दिले आहेत. आज हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात मतदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हिंगोलीतील जटाळेवाडीत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याला 5 लाखांची मदत
हिंगोली जिल्ह्यात विज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत जटाळेवाडी येशील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच काही जनावरे मृत्यूमुखी पडली होती. या गरीब शेतकऱ्याला शासनाकडून पाच लाखांची मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते

Previous Post
Shripal Sabnis | हुकूमशाही प्रवृत्ती संसदीय लोकशाहीला मारक, डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

Shripal Sabnis | हुकूमशाही प्रवृत्ती संसदीय लोकशाहीला मारक, डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

Next Post
Jyoti Waghmare | सुप्रियाताईंना बाहेरच्या म्हटलं तर चालणार आहे का? ज्योती वाघमारेंना शरद पवारांना थेट सवाल

Jyoti Waghmare | सुप्रियाताईंना बाहेरच्या म्हटलं तर चालणार आहे का? ज्योती वाघमारेंना शरद पवारांना थेट सवाल

Related Posts
भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये - Chhagan Bhujbal

भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal

मुंबई | (Chhagan Bhujbal) महाराष्ट्र विधिमंडळाने महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला…
Read More
शहरात समाविष्ट होणाऱ्या नवीन गावांना पाच वर्ष ग्रामपंचायत कर लागणार -Devendra Fadnavis

शहरात समाविष्ट होणाऱ्या नवीन गावांना पाच वर्ष ग्रामपंचायत कर लागणार – Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | पुणे झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात येणारे आमच्या नवीन सरकारकडून…
Read More
मोहम्मद सिराजनंतर टीम इंडियाची 'ही' अष्टपैलू बनली डीएसपी

मोहम्मद सिराजनंतर टीम इंडियाची ‘ही’ अष्टपैलू बनली डीएसपी

Deepti Sharma | भारतीय पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला ( Mohammad Siraj) तेलंगणामध्ये डीएसपी बनवण्यात आले. आता…
Read More