उद्धवजी… छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करताय.? चित्रा वाघ यांचा खोचक सवाल 

Uddhav Thackeray :  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज बारसू (Barsu) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर सोलगावात (Solgaon) रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. तर, ‘लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी प्रकल्प आणू नका. हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला.

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. अखेर उद्धव ठाकरेंच्या पोटातलं ओठावर आलं…ते ज्या कामात एक्सपर्ट आहे तेच बोलून दाखवलं असं त्या म्हणाल्या. ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला घडवलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करताय….?? तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा नाही तर पेटवायचाय…?

उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या आईशी गद्दारी करताय पण आम्ही तुमचे मनसुबे उधळून लावू. कर्तबगार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी राज्याला लाभले आहेत. ज्यांनी तुमच्यासारख्या भल्याभल्यांना वठणीवर आणलंय… असं वाघ यांनी म्हटले आहे.