‘भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीसाठी मैदानात, जनतेनं जागृत व्हावं’

पणजी – निवडणुकीत गोवेकरांकडे दोन पर्याय आहेत; एकतर आप ला मत द्या आणि प्रामाणिक सरकार बनवा किंवा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्या अस आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात दाखल होताच प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले

चार दिवसांच्या दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल यांचे मंगळवारी दुपारी गोव्यात आगमन झाले. ‘आगामी विधानसभा निवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची आहे. गोवेकरांनी ठरवावे की त्यांच्यासाठी काय चांगले आहे. गोवेकरांकडे भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन देणाऱ्या ‘आप’ला पाठिंबा देणे हा एक पर्याय आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणे

काँग्रेसच्या राजकीय पक्षांतराच्या इतिहासाचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत भाजप सरकारला कंटाळलेल्या गोवेकरांनी काँग्रेसची निवड केली. मात्र, काँग्रेसच्या आमदारांनी गोवेकरांना फसवले अस केजरीवाल म्हणाले

‘यावेळीही परिस्थिती तशीच आहे, राज्याच्या प्रत्येक भागात काँग्रेस पक्षांतराची चर्चा आहे. भाजपने नवी रणनीती आखली आहे. काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार आहेत.’ अस ते म्हणाले

"सालसेटेचा बालेकिल्ला जिंकल्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे भाजपला कळले असल्याने, त्यांनी काँग्रेसच्या बॅनरखाली सात उमेदवारांना निवडणुकीत उभे केले आहे आणि ते त्यांना आर्थिक मदत करत आहेत’, असा आरोपही केजरीवाल यांनी केला