महाराष्ट्रमधील काँग्रेस पक्ष आज चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत – विश्वजित कदम 

सांगली : काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात चांगले दिवस येतील. ज्याप्रमाणे एखाद्या वाघाला कोपऱ्यात ढकलले, तर तो चवताळून उठतो तशाच पध्दतीने महाराष्ट्रमधील काँग्रेस पक्ष आज चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत आहे, लोकसभा निवडणुकीत तो भल्याभल्यांना गारद करेल, भाजपला याचा अंदाज नाही, असा आत्मविश्वास काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांनी व्यक्त केला.

विश्वजित कदम यांनी सांगलीत (Sangli News) बोलताना काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर भाष्य केले. कदम म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले वातावरण आहे. मित्रपक्षांसह केलेली महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपने राजकारणात, लोकशाहीत चुकीचा पायंडा पाडला आहे. दुसऱ्याचे पक्ष फोडून सत्तेचे राजकारण ते करताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे सारे मनसुबे धुळीस मिळतील. अशी टीका त्यांनी केली आहे.