शिवसेनेने आता त्यांचे ४ खासदार तरी निवडून आणून दाखवावेत; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेना आव्हान

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, कालच्या या सभेवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सभेमध्ये भाजपवर झालेल्या टीकेनंतर माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. ते सत्ता लंपट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर (tomb of Aurangzeb) जाऊन पाया पडा, नमाज पढा किंवा फुलं वाहा उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाहीये.

उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना आणि आताची शिवसेना (Shivsena) कशी प्रबळ आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले. ‘तुम्ही सोनिया गांधींच्या (Soniya Gandhi) आशीर्वादाने सत्तेवर बसलात आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) तुम्ही हात मिळवणी केली. आमच्याशी युती होती म्हणून तुमचे 55 आमदार तरी निवडून येऊ शकले. आमच्यासोबत युती नसती तर तुमचे २५ आमदार देखील निवडून आले नसते. शिवसेनेने आता त्यांचे ४ खासदार तरी निवडून आणून दाखवावेत’, असे आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.