सत्ता गेल्याचे सुतक अजूनही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांचा हल्लाबोल 

सांगली – सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या (Jayant Patil) चेहऱ्यावर आहे. शरद पवार (Sharad Pawar ) कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून कधी जातोय अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी केली आहे.

सांगलीच्या वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत होते. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडी सरकारने मागच्या अडीच वर्षात काय केलं याचा पाढा देखील त्यांनी वाचला. जयंत पाटलांनी मागच्या अडीच वर्षात सांगलीत काय केलं हे सुद्धा पडळकरांनी सांगितले.

माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. पोलिसांना सांगितले होते की, याला यात अडकावा, पण आम्ही घाबरलो नाही. रोज लढत राहिलो. पण 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर सेना आमदार सुरतला गेलेली बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा उतरला