औरंगाबादेत शिवसेनेचे दोन गट आपसात भिडले; तुंबळ हाणामारी झाली

औरंगाबाद : शिवसेनेतला (shivsena) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या कार्यक्रमात पुन्हा शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले.

औरंगाबादमध्ये वरुण सरदेसाई यांच्या मेळाव्यानंतर शिवसेनेच्या कार्यक्रमात जोरदार हाणामारी झाली आहे. शेकडो कार्यकर्ते यावेळी भिडले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलच तापलं होतं. काही काळानंतर हा वाद शांत झाला. मात्र तोपर्यंत चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

सुरूवातीला दोन गट आमनेसामने आल्यानंतर चांगलाच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खेचाखेची सुरू झाली. त्यानंतर हे दोन आपसात भिडले आणि हाणामारी झाली. वरूण सरदेसाई निघून गेल्यानंतर हा राडा सुरू झाला.