Jitendra Awad | मनसेने महायुतीला पाठींबा जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावर ठाकरे, आव्हाड म्हणाले…

Jitendra Awad | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा देऊ केल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षांच्या निशाण्यावर राज ठाकरे आले आहेत. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘वाघ गवत खायला लागला आहे,’ असा खोचक टोला मनसे अध्यक्षांना लगावला.  तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या 2 शब्दांचा अर्थ नेमका काय असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकेट काढण्याचा तर हा डाव नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे.

ते म्हणाले, आज राज ठाकरेंचा मेळावा होता. मेळावा घ्यायचा कशाला ना? साधं एका वाक्यात ट्वीट केलं असतं की, मोदींना बिनशर्त पाठिंबा पण व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका असं म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण हे व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला समजलेला नाही. तसेच पुढे बोलताना ‘व्याभिचाराला राजमान्यता’ या शब्दांचा काही गर्भीतार्थ आहे का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा